कुटुंबातील मालमत्ता वाटपाबाबतचा कायदा
हिंदू वारसा कायदा 1956 अन्वये हिंदूमध्ये मालमत्तेत मुलींना हिस्सा देण्याची पद्धत अस्तित्वातच नव्हती. या कायद्यातील कलम सहाप्रमाणे व त्यात महाराष्ट्रात 1994मध्ये सुधारणा झालेल्या कायद्याप्रमाणे एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेत मुलींना हक्क उत्तर जीवितेने दिले, तसेच या कायद्यात केंद्र सरकारने आमूलाग्र बदल करून मुलींना जन्मतःच एकत्र कुटुंबांत सहदायक करून घेतले. याचाच अर्थ वाटपात मुलींना डावलता येत नाही. तसेच वडील जिवंत असताना एकत्र कुटुंबातील मालमत्तेचा त्यांचा हिस्सा त्या मागू शकतात. यात वर्ग-1 चे वारस म्हणून मुलगा, मुलगी, विधवा, आई ठरतात. हिंदू एकत्र कुटुंबाचे मिळकतीत प्राप्त होणाऱ्या हिश्श्यात त्यांना उत्तराधिकाराने हिस्सा प्राप्त होतो.
हिंदू वारसा कायदा कलम आठमध्ये पुरुष जर मृत्यूपत्र न करता मयत झाला तर वर्ग-1 मधील कुटुंबीचा त्याचा वारसाहक्क प्राप्त होतो. यात मयताचा मुलगा, मुलगी, विधवा, आई व नातू, नात, सून व त्यांचे व पुढील पिढीचा समावेश होतो (एकूण 12 जण). म्हणजे मूळ पुरुषाच्या मृत्यूच्या वेळीच असलेल्या वर्ग-1 वारसास प्रतिकात्मक वाटप होणे हे तत्त्व कायद्याने गृहीत धरलेले आहे. थोडक्यात एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचे वाटप करताना मुलगा किंवा मुलगी असा फरक करता येत नाही. तसेच मुलींना मिळणारा हक्क सहदायिकी (कोपार्सनरी) म्हणून मिळतो व तो हक्क मृत्यूपत्राद्वारे दिला जातो.
कायद्याचे एक तत्त्व असे आहे, की कोणत्याही मालमत्तेचा वारसा हा अधांतरी किंवा तहकूब राहू शकत नाही किंवा तात्पुरता स्थगितही होत नाह. याचाच अर्थ एखादी व्यक्ती विना मृत्यूपत्र मयत झाल्यावर ताबडतोब त्याचा वारसा हक्क म्हणजेच उत्तर जिविता किंवा उत्तराधिकार अगर कायद्याने प्राप्त होणाऱ्या इतर घटकास होऊ शकतो. विधवेने लग्न केले तरी तिचा हक्क समाप्त होत नाही. विधवा स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या मालमत्तेची ती पूर्ण मालक बनते व त्यानंतर तिने परत लग्न केले तरीसुद्धा तिचा मिळकतीतील हक्क नष्ट होत नाही. हिंदू वारसा कायद्यानुसार कलम 8 प्रमाणे मयत पुरुषांचे वारस वर्ग-1मध्ये नमूद केले आहेत, तर मयत स्त्रीच्या बाबतीत वारस कलम 15 ने निश्चित केले आहेत; मात्र एकत्र कुटुंबाची मिळकत स्त्रीच्या ताब्यात असेल तर आणि सदर मिळकत तिला पोटगी म्हणून खाण्यास दिली नसल्यास तिला पूर्ण मालकी प्राप्त होत नाही.
कायद्याचे एक तत्त्व असे आहे, की कोणत्याही मालमत्तेचा वारसा हा अधांतरी किंवा तहकूब राहू शकत नाही किंवा तात्पुरता स्थगितही होत नाह. याचाच अर्थ एखादी व्यक्ती विना मृत्यूपत्र मयत झाल्यावर ताबडतोब त्याचा वारसा हक्क म्हणजेच उत्तर जिविता किंवा उत्तराधिकार अगर कायद्याने प्राप्त होणाऱ्या इतर घटकास होऊ शकतो. विधवेने लग्न केले तरी तिचा हक्क समाप्त होत नाही. विधवा स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या मालमत्तेची ती पूर्ण मालक बनते व त्यानंतर तिने परत लग्न केले तरीसुद्धा तिचा मिळकतीतील हक्क नष्ट होत नाही. हिंदू वारसा कायद्यानुसार कलम 8 प्रमाणे मयत पुरुषांचे वारस वर्ग-1मध्ये नमूद केले आहेत, तर मयत स्त्रीच्या बाबतीत वारस कलम 15 ने निश्चित केले आहेत; मात्र एकत्र कुटुंबाची मिळकत स्त्रीच्या ताब्यात असेल तर आणि सदर मिळकत तिला पोटगी म्हणून खाण्यास दिली नसल्यास तिला पूर्ण मालकी प्राप्त होत नाही.
2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यात झालेल्या सुधारणांनुसार मुली या जन्माने सहदायक झालेल्या असल्या, तरीसुद्धा 20 डिसेंबर 2004 पूर्वीच्या झालेल्या वाटपासाठी ते लागू पडत नाही. एकत्र कुटुंबात केवळ पुरुष असून, त्याची पत्नी व मुली आहेत, तरी ते एकत्र कुटुंब समजले जाते; तसेच लग्न न झालेल्या मुलींना मुलाइतकाच हक्क मिळतो. मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू पुरुषाची संपत्ती पहिल्यांदा वर्ग-1 मध्ये निर्देशित असतील त्यांना मिळेल. दुसऱ्यांदा जर पहिल्या वर्गातील कोणताही वारसदार नसेल, तर अनुसूची-2 मधील वारसाकडे निर्देशित होईल. तिसऱ्यांदा जर दोहोंपैकी कोणत्याही वर्गाचा वारसदार नसल्यास मृताच्या गोत्रजांकडे आणि तेही नसतील तर अन्य गोत्रजांकडे जाते. या कायद्याचे कलम दहाप्रमाणे अमृत्युपत्र व्यक्तीची संपत्ती अनुसूचीच्या पहिल्या वर्गामधील वारसाकडे जाताना पुढील नियमांप्रमाणे जातील.
नियम -1 - अमृत्युपत्र मयत पुरुषास एकापेक्षा जास्त विधवा असतील, तर सर्व विधवांना मिळून एक हिस्सा मिळेल.
नियम - 2 - अमृत्युपत्र मयत व्यक्तीचे हयात पुत्र, कन्या, माता यांना प्रत्येकी एक हिस्सा मिळेल.
नियम - 3 - अमृत्युपत्र मयत व्यक्तीचे प्रत्येक पूर्व मृत पुत्राचे किंवा पूर्व मृत कन्येचे शाखेतील वारसदारांना आपसांत मिळून एक हिस्सा मिळेल.
नियम - 2 - अमृत्युपत्र मयत व्यक्तीचे हयात पुत्र, कन्या, माता यांना प्रत्येकी एक हिस्सा मिळेल.
नियम - 3 - अमृत्युपत्र मयत व्यक्तीचे प्रत्येक पूर्व मृत पुत्राचे किंवा पूर्व मृत कन्येचे शाखेतील वारसदारांना आपसांत मिळून एक हिस्सा मिळेल.
नियम तीनमधील हिश्श्याचे वाटप
(एक) - पूर्व मृत पुत्राचे शाखेतील वारसदारांमध्ये अशा प्रकारे करण्यात येईल, की त्याची विधवा (एकत्रितपणे) आणि हयात पुत्र व कन्या यांना समान अंश मिळतील.
(दोन) - पूर्व मृत कन्येचा शाखेतील वारसदारांमध्ये अशाप्रकारे करण्यात येईल, की हयात असलेल्या पुत्रांना आणि कन्यांना समान अंश मिळेल.
हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम मृत्यूपत्र न करता मयत झालेल्या हिंदू स्त्रीची संपत्ती- (अ) पहिल्यांदा पुत्र व कन्या (पूर्व मृत पुत्र व कन्या यांची अपत्ये धरून) आणि पतीकडे (नसल्यास). (ब) दुसऱ्यांदा पतीच्या वारसांकडे. (क) तिसऱ्यांदा माता आणि पित्याकडे. (ड) चौथ्यांदा पित्याच्या वारसदाराकडे. (ई) शेवटी मातेच्या वारसदाराकडे. मात्र, हिंदू स्त्रीला तिच्या माहेरकडून मालमत्ता मिळाली असल्यास व तिला स्वतःची मुले नसल्यास, परत पित्याचे वारसदारांकडे जाते; मात्र पतीकडून वा सासऱ्याकडून मालमत्ता मिळालेली असल्यास मृतास स्वतःचे मुलगा, मुलगी नसल्यास पतीचे वारसदाराकडे जाईल. हिंदू ----मिताक्षरी कुटुंबामध्ये मुलगा जन्मल्यानंतर वडिलांइतकाच हिस्सा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत प्राप्त होतो. वडील हे हिंदू एकत्र कुटुंबाचे श्रेष्ठ नातेवाईक व एकत्र कुटुंबाचे प्रमुख/कर्ता असतात व त्यांना एकत्र कुटुंबाचे मालमत्ता पुढील कारणांसाठी हस्तांतरित करण्याचा, विकण्याचा हक्क असतो.
(एक) - पूर्व मृत पुत्राचे शाखेतील वारसदारांमध्ये अशा प्रकारे करण्यात येईल, की त्याची विधवा (एकत्रितपणे) आणि हयात पुत्र व कन्या यांना समान अंश मिळतील.
(दोन) - पूर्व मृत कन्येचा शाखेतील वारसदारांमध्ये अशाप्रकारे करण्यात येईल, की हयात असलेल्या पुत्रांना आणि कन्यांना समान अंश मिळेल.
हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम मृत्यूपत्र न करता मयत झालेल्या हिंदू स्त्रीची संपत्ती- (अ) पहिल्यांदा पुत्र व कन्या (पूर्व मृत पुत्र व कन्या यांची अपत्ये धरून) आणि पतीकडे (नसल्यास). (ब) दुसऱ्यांदा पतीच्या वारसांकडे. (क) तिसऱ्यांदा माता आणि पित्याकडे. (ड) चौथ्यांदा पित्याच्या वारसदाराकडे. (ई) शेवटी मातेच्या वारसदाराकडे. मात्र, हिंदू स्त्रीला तिच्या माहेरकडून मालमत्ता मिळाली असल्यास व तिला स्वतःची मुले नसल्यास, परत पित्याचे वारसदारांकडे जाते; मात्र पतीकडून वा सासऱ्याकडून मालमत्ता मिळालेली असल्यास मृतास स्वतःचे मुलगा, मुलगी नसल्यास पतीचे वारसदाराकडे जाईल. हिंदू ----मिताक्षरी कुटुंबामध्ये मुलगा जन्मल्यानंतर वडिलांइतकाच हिस्सा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत प्राप्त होतो. वडील हे हिंदू एकत्र कुटुंबाचे श्रेष्ठ नातेवाईक व एकत्र कुटुंबाचे प्रमुख/कर्ता असतात व त्यांना एकत्र कुटुंबाचे मालमत्ता पुढील कारणांसाठी हस्तांतरित करण्याचा, विकण्याचा हक्क असतो.
1) एकत्र कुटुंबाचे -------उन्नत्तीकरिता/ कर्ज फेडण्याकरिता.
2) एकत्र कुटुंबाचे मालमत्तेचे सुधारणेकरिता.
3) एकत्र कुटुंबाचे धार्मिक ------.
4) मुलांचे शिक्षण/ लग्नाकरिता.
जेणेकरून सदर हस्तांतरित हिस्सा सज्ञान किंवा अज्ञान सभासदांवर भारभूत होईल.
या संबंधीचा निवाडा उच्चतम न्यायालयाने ए.आस.आर. 2005 कर्नाटक एकमध्ये दिलेला आहे.
असे बरेच दावे महाराष्ट्रात चालू असतात. वडील जमीन विकतात अन् तेच अज्ञान मुलांना सज्ञान झाल्यावर किंवा सज्ञान मुलांना त्यांच्याच विरुद्ध दावे करण्यास सांगतात. साधारणपणे अशी जमीन खरेदी करताना वरील कारणांचा उल्लेख करून व सर्व मुलांचे वारसांच्या नावे मोबदल्यातील काही रकमेची सहमतीने तरतूद करून ठेवल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत व उद्भवले तरी दावा सिद्ध करणे सोपे जाईल.
2) एकत्र कुटुंबाचे मालमत्तेचे सुधारणेकरिता.
3) एकत्र कुटुंबाचे धार्मिक ------.
4) मुलांचे शिक्षण/ लग्नाकरिता.
जेणेकरून सदर हस्तांतरित हिस्सा सज्ञान किंवा अज्ञान सभासदांवर भारभूत होईल.
या संबंधीचा निवाडा उच्चतम न्यायालयाने ए.आस.आर. 2005 कर्नाटक एकमध्ये दिलेला आहे.
असे बरेच दावे महाराष्ट्रात चालू असतात. वडील जमीन विकतात अन् तेच अज्ञान मुलांना सज्ञान झाल्यावर किंवा सज्ञान मुलांना त्यांच्याच विरुद्ध दावे करण्यास सांगतात. साधारणपणे अशी जमीन खरेदी करताना वरील कारणांचा उल्लेख करून व सर्व मुलांचे वारसांच्या नावे मोबदल्यातील काही रकमेची सहमतीने तरतूद करून ठेवल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत व उद्भवले तरी दावा सिद्ध करणे सोपे जाईल.
दत्तक मुलाला हक्क मिळत नाही
कायद्याने कलम 14 प्रमाणे विधवा स्त्रीचे मालमत्तेचे रूपांतर पूर्ण मालकीचे होते, मात्र हिंदू वारसा कायद्यानुसार हिंदू स्त्रीने एखादा मुलगा दत्तक घेतल्यास त्या दत्तक मुलाला विधवेला मिळालेल्या मिळकतीत कसलाही हक्क प्राप्त होत नाही; परंतु जर एखादा सहवारसदार मयत झाला आणि त्याच्या विधवेने एकत्र कुटुंब असताना मुलगा दत्तक घेतल्यास आणि मिळकत एकत्र असल्यास दत्तक घेतलेल्या मुलाला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत हक्क प्राप्त होतो, परंतु नंतर दाखल या कायद्याचे कलम 14 (1) प्रमाणे हिंदू स्त्रीला कोणत्याही मार्गाने मिळालेल्या मिळकतीची ती संपूर्ण मालक होते व ती तिच्या इच्छेप्रमाणे त्याची विल्हेवाट करू शकते. यास अपवाद फक्त तिच्या दत्तक मुलाचा आहे.
कायद्याने कलम 14 प्रमाणे विधवा स्त्रीचे मालमत्तेचे रूपांतर पूर्ण मालकीचे होते, मात्र हिंदू वारसा कायद्यानुसार हिंदू स्त्रीने एखादा मुलगा दत्तक घेतल्यास त्या दत्तक मुलाला विधवेला मिळालेल्या मिळकतीत कसलाही हक्क प्राप्त होत नाही; परंतु जर एखादा सहवारसदार मयत झाला आणि त्याच्या विधवेने एकत्र कुटुंब असताना मुलगा दत्तक घेतल्यास आणि मिळकत एकत्र असल्यास दत्तक घेतलेल्या मुलाला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत हक्क प्राप्त होतो, परंतु नंतर दाखल या कायद्याचे कलम 14 (1) प्रमाणे हिंदू स्त्रीला कोणत्याही मार्गाने मिळालेल्या मिळकतीची ती संपूर्ण मालक होते व ती तिच्या इच्छेप्रमाणे त्याची विल्हेवाट करू शकते. यास अपवाद फक्त तिच्या दत्तक मुलाचा आहे.
No comments:
Post a Comment